राज्य हादरले ! मुलगा नात्यातील मुलगी पळवून घेऊन गेला म्हणून दौंडच्या नदीत सात जणांची सामूहिक आत्महत्या…!

दौंड : दौंड येथील भीमा नदीत एक कुटूंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे राहाण्यासाठीचे सामान पाल ठोकुन राहाण्याचे साहीत्यासह घेऊन निघोज या गावातून निघुन गेलेल्या या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह आढळले होते.
पारनेर तालुक्यातील मोहन उत्तम पवार, त्यांची पत्नी संगिता मोहन पवार, मुलगी राणी शाम फुलवरे, जावई शाम फुलवरे या चौघ जणांचे मृतदेह आढळले होते. आज दुपारी बेपत्ता असलेल्या तीन चिमुरड्यांचा देखील शोध लागला. राणी आणि श्याम फुलवरे या दाम्पत्याची ही तीन मुले आहेत.
असे असताना आता याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मोहन पवार यांना दोन मुले आहेत. त्यापैकी राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने दोन दिवसापूर्वी त्याच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळून आणली. घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले.
या दोघांनी 24 तासात अमोलला ही मुलगी परत कर असा लाकडा लावला. यामुळे आपल्या अब्रूचे खोबरे होते आहे, नाहीतर आम्ही सर्वजण विष पितो, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला.
असे असताना मात्र अमोल माघारी आला नाही. शेवटी त्यांनी राहुल ला पुण्यात फोन केला आणि सर्व घटना सांगितली, जर अमोल परतला नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ असे मोहन पवार यांनी राहुलला सांगितले, आणि सर्वांनी टोकाचे पाऊल उचलले.
यामध्ये मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे, अशी सापडलेल्या मृतदेहाची नावे असुन त्यांच्या सोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. भटकंती करणारे हे कुटुंब आहे.