लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा; म्हणाले, ॲक्शनला रिएक्शन मिळेल, पण…


मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राजकारण्यांवर चांगलीच आगपाखड केली. हैदराबाद गॅझेटवरून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना चांगलेच सुनावले. मुळात इथले राजकारणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात खोटं बोलत आहेत.

वास्तव पाहता कुणामध्येही डेरिंग धाडस नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांनी राज्यात ॲक्शनला रिएक्शन देण्यात येईल असा इशारा दिला. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी नेते दुखावल्या गेल्याचे समोर येत आहे.

हाकेंनी आंदोलकांना आश्वस्त करत सांगितले की ते लोकशाही पद्धतीने मोर्चे काढून आंदोलन करतील. आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आवाज बुलंद करू. जर ओबीसी जागा झाला तर अनेक आमदार, खासदार, अर्थमंत्री, कारखानदार आणि नेत्यांना त्यांच्या खुर्च्या टिकवणं कठीण होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच २०२९ पर्यंत महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा खरा प्रभाव दिसेल, असेही ते म्हणाले आहे.

यावेळी हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर थेट टीका केली. जरांगे हा फाळकुट माणूस आहे, चावडीवर बसणारा माणूस आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. स्वतःवर सात-आठ वेळा हल्ले झाल्याचा उल्लेख करत त्यांनी गृह विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणीही केली.

हाकेंनी गंभीर आरोप करत सांगितले की, आतापर्यंत लाखो बोगस प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. शासनच बेजबाबदार असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाज एवढा अशिक्षित आहे का की वंशावळ शोधू शकत नाही? मराठा समाजात मुख्यमंत्री आहेत, पण ओबीसीचेही मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हे १४ कोटी जनतेचे आहेत, म्हणून जबाबदारीने वागा, असेही हाकेंनी स्पष्ट केले आहे.

हाकेंनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. ते कारखानदारीचे नेते आहेत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात आहेत. निवडणुका जिंकणे आणि कारखानदारी चालवणे एवढंच त्यांच्या नावे आहे. मुळात त्यांना मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न आहे, पण कारखानदारीच्या जोरावर मुख्यमंत्री होता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!