खुशखबर की वाढणार चिंता? PM किसान योजनेच्या 21 व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर…

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील २१ व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता तुमच्या खात्यात पैसे येती की नाही, याची चितंता वाढली आहे.

गेल्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते. कारण म्हणून आधार लिकिंग, KYC अपूर्ण असणे, चुकीची बँक माहिती आणि तांत्रिक बिघाड समोर आले होते. यावेळी अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारांना कडक ताकीद दिली आहे.
याशिवाय गावोगावी विशेष शिबीर भरवण्यात येणार आहे. येथे शेतकऱ्यांची KYC, आधार लिंकिंग आणि बँक खात्यांची माहिती अपडेट केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळेल, तर अपात्र किंवा बोगस लाभार्थ्यांची माहिती उघड होणार आहे.

तसेच ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये थेट जमा केले जातात. ही मदत तीन हप्त्यांत म्हणजे दर चार महिन्यांनी 2000 रुपये अशा स्वरूपात दिली जाते.

आतापर्यंत केंद्र सरकारने 20 हप्त्यांमध्ये जवळपास 3.90 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. योजनेमुळे लाखो लहान शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे की, गाव पातळीवर शिबिरांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. पंचायत स्तरावरही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामुळे भविष्यात एकाही पात्र शेतकऱ्याचा हप्ता अडकणार नाही, अशी अपेक्षा आहे.