आता शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याला लागणार कर!! शेतकरी आक्रमक, राजू शेट्टी म्हणाले, सरकारला किंमत मोजावी लागेल…


कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरलेल्या भुगर्भातील पाण्याला कर आकारणी करणार असल्याचे समजते. देशभरातील शेतकऱ्यावर सुलतान फिरोजशहा तुघलकाप्रमाणे हा जीझीया कर आकारला जाणार असून केंद्र सरकारला याची किंमत मोजावी लागणार आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाकडून देशभरातील शेतकरी विहीर व कुपनलिकामधून शेतीसाठी जो पाणी वापरतो त्या पाण्यावर कर लावण्याचा विचार करत आहे.

मुळातच देशभरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहीर व कुपनलिका यांची खुदाई करून पाईपलाईन व्दारे शिवारात पाणी आणल्याने तो स्वयंपुर्ण आहे याकरिता केंद्र व राज्य सरकारचे कोणतेच योगदान नाही. याऊलट भुगर्भात व नद्यांच्या पाण्यात झालेल्या प्रदुषणाबाबत केंद्र सरकारने कधीच भ्र शब्द काढले नाही.

संपुर्ण देशभरात अनेक उद्योगपतींनी उद्योगधंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण केले आहे. संपुर्ण देशभरातील शेतकरी आपल्या शिवारातील पिकांच्या माध्यमातून कार्बन डाय ॲाक्साईड, कार्बन मोनोॲाक्साईड व नायट्रोजन सल्फाईड हे वायू घेतो व ॲाक्सिजन तसेच कार्बोहायड्रेटस व प्रथिने देतो.

वास्तिवक पाहता संपुर्ण देशभरामध्ये कार्बन क्रेडिटचे खरे श्रेय शेतकऱ्यांचे आहे. यामुळे केंद्र सरकारला खरोखरच पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर येवून पाणी वापराचा व त्यातून निर्माण झालेल्या ग्लोबल वर्मिंग मधील शेतकऱ्यांच्या श्रमाचा हिशोब सांगावा.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत वेळीच केंद्र सरकारने योग्य पावले उचलली नाहीत तर नक्कीच सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असेही राजू शेट्टी म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!