गृहिणींनो… आताच सिलिंडर भरून ठेवा; गॅस सिलिंडर महागणार, भारताकडे फक्त १६ दिवसांचा साठा उपलब्ध, नेमकं कारण काय?


नवी दिल्ली : भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात. आता इराणने होर्मुझची समुद्रमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, जो कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जगभरातील ऊर्जा बाजार अस्थिर झाले आहेत. अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे एलपीजीसह इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या देशांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात लवकरच मोठी वाढ होऊ शकते.

अहवालानुसार, भारतात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीपैकी सुमारे ६६% गॅस आयात केला जातो, आणि त्यातील ९५% सौदी अरेबिया, यूएई आणि कतार या पश्चिम आशियातील देशांतून येतो. या प्रदेशातील युद्धामुळे पुरवठा अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील आयात टर्मिनल्स, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लांटमध्ये केवळ १६ दिवसांचा एलपीजी साठा शिल्लक आहे. जर युद्धामुळे आयात बंद झाली, तर भारतात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा भासू शकतो.

एलपीजीची मागणी गेल्या काही वर्षांत दुप्पट झाली असून, देशात ३३ कोटी कुटुंबं एलपीजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे साठवणुकीवरील मर्यादा आणि आयातीवरील अवलंबित्व भारतासाठी गंभीर बाब ठरू शकते.

दरम्यान, दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत भारत मजबूत स्थितीत आहे. भारत हा दोन्ही इंधनांचा निव्वळ निर्यातदार असून, देशांतर्गत गरज भासल्यास निर्यात वळवून पूर्तता करता येऊ शकते. सध्या २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा रिफायनरीज, पाइपलाइन, जहाजे आणि स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये उपलब्ध आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!