पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ, वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली, ५ भाविक थोडक्यात बचावले..

पंढरपूर : याठिकाणी सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. याठिकाणी सध्या पालखीमुळे वारकरी जमायला सुरुवात झाली आहे. उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे आषाढी सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या हजारो भाविकांसमवेत पंढरपूरची वाट चालत आहेत.
चंद्रभागेत सोडलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा अंदाज न आल्याने भाविकांच्या बुडण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे याठिकाणी येताना काळजी घेणे आवश्यक आहे. काल एका दिवसात सहा भाविकांना चंद्रभागेत बुडताना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचविले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याठिकाणी स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत असून प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आता पुढे येत आहे. उजनी धरणामधून जवळपास 26,600 विसर्गने पाणी सोडण्यात येत आहे. यात्रा कालावधीत पाऊस झाल्यास धरणात पाणी साठवता यावे, यासाठी हे नियोजन प्रशासनाने केले.
याठिकाणी बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक कोळी बांधवांची नेमणूक केलेली असून याच कोळी बांधवांनी काल सहा भाविकांना वाचवले आहे. चंद्रभागा व वाळवंटातील काही मंदिरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आषाढीला भाविकांना चंद्रभागेत स्नानापुरते पाणी ठेवण्यासाठी 28 ते 29 जून पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे.
सध्या चंद्रभागा वाळवंटातही पाणी वाढण्यास सुरुवात झाली असून पुंडलिकासाठी इतर मंदिरात जाताना भाविकांना पाण्यातून जावे लागत आहे. काल भागवत एकादशी असून पंढरपूर महासफाई अभियाना अंतर्गत जवळपास 6 स्वयंसेवक सोबत पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि आमदारांनी सफाई केली. आता मोठ्या प्रमाणावर भाविक याठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे.