वैष्णवांचा अवघा रंग एक झाला! संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी दाखल…

लोणी काळभोर – तुळशीराम घुसाळकर
“संंपदा सोहळा नावडे मनाला,
लागला टकळा पंढरीचा
जावे पंढरीसी आवडी मनासी,
कई एकादशी आषाढी ये
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी,
त्याची चक्रपाणी वाट पाहे”
अश्या भजनांच्या ओळी गात खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी गंध, गळ्यात तुुळशीची माळ व मुखाने ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करत, सोबतीला आसमंतांत घुमनारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामांत दंग झालेले वारकरी भक्ती भावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात, विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेली लाखो टाळकरी, फडकरी, वारकरी यांची मांदियाळी पुण्यनगरीतील दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेवून टाळ मृदूंगाच्या निनादांत व टाळ – मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारक-यांसह जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आला. त्यावेळी पंचक्रोशीत जणूू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपुुुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध सामाजिक संस्था,संघटना यांनी अपुर्व उत्सहांत फुलांची उधळण करत केेले.
यावेळी लोणी काळभोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झालेे होते. संत भजनांच्या ओळी गात खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, गळ्यात तुुळशीची माळ व मुखाने ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करत, सोबतीला आसमंतांत घुमनारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामांत दंग झालेले वारकरी भक्ती भावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात, विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेली लाखो टाळकरी, फडकरी, वारकरी यांची मांदियाळी टाळ मृदूंगाच्या निनादांत व टाळ – मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारक-यांसह जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर मुक्कामी आला त्यावेळी पंचक्रोशीत जणूू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपुुुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी अपुर्व उत्सहांत फुलांची उधळण करत केेले.
पुणे येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज पहाटे विधीवत पूजा झालेनंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली.पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेवून सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर कडे मार्गक्रमण केले. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात मिळालेली विश्रांती, यामुळे ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणी फडकरी झपझप पावले टाकत होते. डोळे पंढरीकडे, मुखी विठूरायाचे अखंड नाम उच्चारत व नाम घोष करत अथकपणे व सातत्याने सर्व वारकरी एकवटून पायी विठोबाच्या दर्शनाच्या आशेने व ओढीने महामार्गावरील एक – एक टप्पा मागे टाकत हा पालखी सोहळा रथापुढे २६ व मागे ३७९ अश्या एकूण ४०५ दिंड्यातील सुमारे ४ लाख वारक-यांसमवेत कवडी पाट येथे सोहळ्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी तेथे शिरुर- हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, शिवसेना जिल्हा संघटक रमेश भोसले आदींनी स्वागत केले.
पालखी संभाजी नगर येथे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे वतीने महाराष्ट्र केसरी पैलवान राहूल काळभोर व कार्यकर्त्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाचे वतीने रेनकोटचे वाटप केले. हिंदुस्थान व भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे सर्व ट्रान्सपोर्टस, ड्रायव्हर व क्लीनर्स तसेच एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी त्याचे स्वागत केले. लोणी स्टेशन येथे माजी सरपंच नंदू काळभोर व त्यांच्या सहका-यांनी स्वागत केले. याठिकाणी विश्वराज हॉस्पिटल व वैष्णवी नर्सिंग होमनजीक हवेली डॉक्टर असोशिएनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यांत आले होते. तसेच तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे वतीने एक टन भुईमूग शेंगा वाटण्यात आल्या.
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारांस पालखी सोहळ्याने पुणे – सोलापूर महामार्ग सोडून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नवीन पालखी तळाकडे मार्गक्रमण केले त्यावेळी सर्व वारकरी टाळमृदूंगाच्या ठेक्यावर बेधुंद होवून नाचत होते. यावेळी वरुणराजाने विश्रांती घेतली होती. टाळ – मृदुंगाच्या झंकाराने संंपुर्ण आसमंत निनादून गेला होता. काही जण फुगड्या खेळत होते तर काहीनी मानवी मनोरे उभारून भागवत धर्माची पताका आसमंतात फिरवून आपला आनंद व्यक्त केला. त्याच अपुर्व उत्साहांत कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामस्थांनी त्याचे फुलाच्या वर्षावांत स्वागत केले. यावेळी दुुुतर्फा नागरिक दर्शनासाठी ऊभे होते. ते रथाच्या पुढे डौलाने चालणा-या मानाच्या अश्वाचे दर्शन भक्तिभावाने घेत रथात ठेवलेली तुकाराम महाराज पालखी व पादुुुका दिसल्या तरी कृृृतकृत्य होत होते.
देव पहावया गेलो । तेथे देवची होऊन गेलो।।
तुका म्हणे धन्य झालो। आजि विठ्ठला भेटलो॥
या अभंगांची अनुभूती प्रत्यक्षात घेत होते.
पृथ्वीराज कपूर मेमोरीयल हायस्कूलचे ढोल लेझीम पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. तर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन मुलगी वाचवा आणी वृक्षदिंडीद्वारे झाडे लावा, झाडे जगवा आणी पर्यावरण वाचवा असा संदेश देवून जनजागृती केली तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलामंचच्या कलाकारानी ग्रामस्वच्छता अभियान, महिला सबलीकरण व पर्यावरणांबाबत जनजागृती केली. यावेळी वनखाते पुणे यांच्या वतीने प्रथमच एक झाड आईसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत एक हजार वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल प्रमोद रासकर, वनरक्षक अंकुश कचरे (लोणी), अशोक गायकवाड (खामगांव टेक), कोमल सपकाळ (अष्टापूर), पुजा कुबल (डोंगर गांव), प्रिती लागले (आळंदी म्हातोबा), ऋतुजा कचरे (थेऊर) व वनमजूर उपस्थित होते.
पालखी सोहळा पालखी तळावर मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली.यावेळी हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, मंडल अधिकारी लक्ष्मण भांडे (लोणी काळभोर), रूपाली सरतापे (वाघोली), माधुरी बागले (उरुळी कांचन), तसेच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, अष्टापुर नायगाव पेठ, सोरतापवाडी, वाघोली , थेऊर, वाघोली, शिंदवणे, वाडेबोल्हाई, येथील ग्राममहसुल अधिकारी तसेच पोलीस पाटील दादा काळभोर (लोणी काळभोर), भिसे (कदमवाकवस्ती) यांचे समवेत हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी वनवे, पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती अनिल टिळेकर, माजी उपसभापती युगंधर काळभोर, सदस्या गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड उपस्थित होते. रात्री जागर व किर्तन झाले.
योगिनी एकादशीचा उपवास असल्याने सर्व वारक-यांना अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठाण (ट्रस्ट), विश्वरत्न फौंडेशन, संत निरंकारी मंडळ, शितलाशक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरूण मंडळ, संत रोहिदास चॅरीटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरूण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठाण, राजा शिवछत्रपती तरूण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमुर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरूण मंडळ, क्रातीविर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लिम आणी सरदार समाज बांधव व इतर सेवाभावी संस्थानी चहा व खिचडी, चिवडा, केळी आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. रात्रभर चाललेल्या भजन, किर्तन, जागर, प्रवचन व हरीनामाच्या जागरामुळे संपुर्ण लोणी काळभोर पंचक्रोशीतील परीसर विठ्ठलमय होवून गेला होता. पालखी तळावर पालखीचा मुक्काम असला तरी पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या गावातील मंदिरे, शाळा, कॉलेज व आपल्या नेहमीच्या ठिकाणी मुक्कामी होत्या.