पुन्हा ५०० ची नोट बंद होणार? एटीएममध्ये वाढल्या १००-२०० च्या नोटा! महत्वाची माहिती आली समोर..


नवी दिल्ली : देशातील बहुतांश एटीएममध्ये अलीकडे १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा भरणा वाढत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. याआधी अनेक एटीएममध्ये मुख्यतः ५०० रुपयांच्या नोटाच दिल्या जात होत्या, मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे.

या बदलामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय आहे. एप्रिल २०२५ मध्ये आरबीआयने सर्व बँकांना एटीएममध्ये लहान चलन भरण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत किमान ७५ टक्के एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा असणे आवश्यक आहे.

दरम्यान, यापुढे ३१ मार्च २०२६ पर्यंत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे. यामुळे आता 500 रुपयांच्या नोटांवर बंदी येणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

सीएमएस इन्फो सिस्टिम या देशातील सर्वात मोठ्या रोख व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्ष अनुश राघवन यांच्या मते, अजूनही देशातील ६० टक्के लोक कॅश व्यवहार करतात. त्यामुळेच लहान चलन उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांना १००-२०० रुपयांच्या नोटा वापरणे सोयीचे ठरते.

मात्र दुसरीकडे, एटीएम व्यवहार शुल्कात वाढ झाल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. १ मे २०२५ पासून, दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्यात 3 वेळा मोफत पैसे काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली असून त्यानंतर प्रत्येक वेळी 19 रुपये शुल्क आकारले जात आहे. बॅलेन्स तपासणीसाठी देखील आता 7 रुपये द्यावे लागतात.

आरबीआयच्या या लहान चलन धोरणानंतर ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही तज्ज्ञ आणि राजकीय नेते जसे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही मोठ्या मूल्याच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की बनावट नोटा आणि मनी लाँडरिंग रोखण्यासाठी ५०० च्या नोटा बंद कराव्यात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!