Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदही नाही, गृहमंत्रीपदही नाही!! विद्यमान मंत्र्यांपैकी ४ जणांवर भाजपचा आक्षेप, राज्यात नेमकं घडतंय काय?


Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय होताना दिसत नाही. Eknath Shinde

आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतली असली तरी, त्यांनी गृहमंत्री पद मागितले आहे. परंतु भाजपच्या वर्तुळातील चर्चेनुसार त्यांना गृहमंत्री पद दिले जाणार नाही, शिवाय त्यांनी जी १२ मंत्रिपदे मागितली आहेत, त्यापैकी चार जणांवर भाजपचाच आक्षेप आहे. मागील सरकारमध्ये अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड हे चारही मंत्री होते.

त्यांना पुन्हा मंत्री करण्याचा एकनाथ शिंदे यांचा मनोदय आहे, मात्र राज्यातील त्यांची प्रतिमा व या चार मंत्र्यांचा मागील सत्ता काळात असलेला कारभार या विषयावरून भाजपचा या चार जणांवर आक्षेप असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तहाच्या बोलण्यामध्ये या चार नावावर नेमकी काय चर्चा होणार आणि एकनाथ शिंदे माघार घेणार की चौघांना मंत्रीपद मिळणार याचीही उत्सुकता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!