Crime News : भांडण मिटवणे आलं अंगलट, मुंबईत २२ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार, भयंकर माहिती आली समोर…


Crime News : राज्यात गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार राज्यात वाढत आहे.

आता नुकतंच सायन कोळीवाड्यात एका २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सायन कोळीवाड्यातील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री १२.३० च्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. विवेक गुप्ता असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत विवेक गंभीर जखमी झाला. Crime News

त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नगर परिसरात रात्री उशिरा काही लोक आवाज करत मोठा गोंधळ करत होते.

यामुळे विवेक आणि त्यांचा वाद झाला. सुरुवातीला त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरु होती. मात्र काही वेळातच हा वाद टोकाला पोहोचला. यानंतर काहींनी विवेकवर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!