Kolhapur : जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला, कोल्हापुरातील वेदगंगा नदीत बुडून चौघांचा करुण अंत…


Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवर असणाऱ्या बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. अन्य एकाचा शोध सुरु आहे.

जितेंद्र विलास लोकरे (वय मुर.३६ गुड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय.३४, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय.२७ रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय. १७ अथणी, कर्नाटक) अशी त्यांची नाव आहेत.

नेमकं घडलं काय?

सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. कागल तालुक्यातील अनुर येथे गावची जत्रा होती. या जत्रेसाठी अनेक पाहुणे गावात आलेले होते. काल दुपारच्या वेळी हे सारे जण वेदगंगा नदीवर गेले होते. महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. परंतु या अंदाज कोणाला आला नाही. Kolhapur

कपडे धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येलमले या दोघी पाण्यात बुड लागल्या, तेव्हा त्यांना वाचण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमले हे दोघेजण उतरले. परंतु तेही पाण्यात बुडाले.

याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी या बंधाऱ्याकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. नागरिकांनी लगेच शोधकार्य सुरू केले.

जितेंद्र लोकरे, रेश्मा येलमले व सविता कांबळे या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र बेपत्ता झालेल्या यश येळमले यांच्यासाठी ही शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!