मोठी बातमी! लोकसभेसाठी अजितदादांनी केली इतक्या जागांची मागणी, शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

मुंबई : राजकारण तोंडावर आले असून राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) कमी जागा मिळतील अशी चर्चा सुरु आहे. लोकसभेसाठी अजित पवार गट सात ते आठ जागांसाठी आग्रही असून त्यापैकी कमीत कमी सहा जागा आपल्याला मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी शिरूर, सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली आणि बुलढाणा या जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पण साताऱ्याची जागा भाजपाला पाहिजे आहे तर गडचिरोली येथे भाजपा चिन्हावर राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री बाबाराम आत्राम यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका घेतली जात आहे.
पण राष्ट्रवादीचे नेते त्यास अनुकूल नाहीत. परभणी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे आता या जागांचा तिढा कसा सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.