यशवंत कारखान्याची चिमणी पेटवून शेतकरी सभासदांना न्याय देणार; आण्णासाहेब मगर रयत पॅनेल प्रमुख माधव अण्णा काळभोर यांनी यांचा विश्वास..!!

उरुळीकांचन : यशवंत कारखान्यात भविष्यात नवीन अत्याधुनिक प्लॅन्ट सुरू करुन कारखाना सुरू करण्यास प्राधान्य देणार असून नवीन कारखाना सुरू केला तर साखर उतारा वाढतो, बगॅस जास्त शिल्लक रहातो. नवीन कारखान्यात कामगारांचा पगार कमी लागतो. त्यामुळे कारखान्याला प्रतिवर्ष १० कोटींचा फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा बाजारभाव प्रतिटन २०० रुपयांनी जास्त देता येईल. कारखाना सुरू करण्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेली आहे.असा विश्वास आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल प्रमुख माधवआण्णा काळभोर यांनी व्यक्त केला आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खोकलाई देवी चौकात अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलची प्रचार सांगता सभा गुरुवारी सायंकाळी पार पडली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी कांचन, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, कारखान्याचे माजी संचालक सुरेश घुले, सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, महादेव कांचन, राजीव घुले, रोहिदास उंद्रे, राजेंद्र टिळेकर, सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मेहुणे उमेश शहा, राजेंद्र खांदवे, प्रवीण कामठे, लोचन शिवले, वंदना काळभोर, बाबासाहेब काकडे, मारुती कुंजीर, रामभाऊ कुंजीर, तुकाराम पवार, सुभाष उंद्रे, भरत कुंजीर, अशोक खांदवे, जी. ब. चौधरी, उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन, लोणी काळभोरचे माजी सरपंच शरद काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, कमलेश काळभोर आदी उपस्थित होते.
माधव आण्णा काळभोर पुढे म्हणाले, जुना कारखाना किंवा संपूर्ण नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कारखाना सुरू करण्यात येईल. नवीन कारखाना सुरू केला तर साखर उतारा वाढतो, बगॅस जास्त शिल्लक रहातो. नवीन कारखान्यात कामगारांचा पगार कमी लागतो. त्यामुळे कारखान्याला प्रतिवर्ष १० कोटींचा फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा बाजारभाव प्रतिटन २०० रुपयांनी जास्त देता येईल. कारखाना सुरू करण्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेली आहे.
आम्हाला प्रचार काळात मतदारांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याने आमचा विजय निश्चित असून आम्ही भविष्यात कारखाना सुरू करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
कारखान्याला कर्जपुरवठ्यासाठी बँकांशी चर्चा झाली आहे. केंद्र व राज्य सरकार, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्या मदतीने निधी उपलब्ध होणार आहे. फक्त आरोप करुन कारखाना सुरू होणार नाही. त्यामुळे आम्ही असल्या आरोपांकडे लक्ष न देता कारखाना सुरू करण्यावर भर दिला आहे, असे माधव काळभोर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राजीव घुले म्हणाले, २०११ साली फक्त ३१ कोटी रुपये कर्ज यशवंत कारखान्यावर होते. तरीही यशवंत कारखाना प्रशासकाच्या ताब्यात दिला. महाराष्ट्रातील इतर अनेक सहकारी साखर कारखान्यांवर २०० कोटी कर्ज होते, तरी शासनाने प्रशासकाच्या ताब्यात दिले नाहीत. वन टाईम सेटलमेंट करुन हे कर्ज कमी होऊ शकते. त्यामुळे एक गुंठा जमीन न विकता आपण कारखाना सुरू करु शकतो.
मी नांदेड जिल्ह्यात एक साखर कारखाना यशस्वीपणे चालवत आहे. यशवंत कारखाना सुरु व्हावा म्हणून मी माझ्या तेथील अनुभवाचा उपयोग करणार आहे. या संदर्भात माधव काळभोर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करुन आम्ही चांगल्या पद्धतीने चालवू. या संदर्भात आवश्यक तेथे बँका, राज्य व केंद्र सरकार यांची मदत घेणार आहे.
यावेळी प्रविण कामठे, वंदना काळभोर, अंकुश कोतवाल, लोचन शिवले, संतोष कांचन, राजेंद्र खांदवे, रामदास चौधरी, रोहिदास उंद्रे, सुरेश घुले यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी केले.