UP Politics : इंडिया आघाडीतील पक्षांची गळती सुरूच! आता रालोड देखील भाजपसोबत जाण्याच्या तयारीत….

UP Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत गेले. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. आता उत्तर प्रदेशमध्ये देखील इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत.
विशेष म्हणजे ते अखिलेश यादव यांच्यासोबत सात जागा घेणार होते. पण, आता ते भाजपसोबत पाच जागा देखील घेण्यास तयार असल्याची माहिती आहे. रालोद आणि भाजप नेत्यांची चर्चा सुरु असून लवकरच याबाबत जयंत चौधरी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जयंत चौधरी याबाबत लवकरत निर्णय घेण्याची शक्यता आहे. चौधरी यांनी सपासोबत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अखिलेश यादव आणि त्यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. मात्र, जयंत चौधरी हे भविष्याची चिंता करत भाजपसोबत जाण्याचा विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. UP Politics
दरम्यान, जयंत चौधरी यांना इंडिया आघाडीसोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाण्यात अधिक लाभ दिसून येत आहे. २०२२ मध्ये सपाच्या समर्थनानेच जयंत चौधरी हे राज्यसभा खासदार बनले होते. ते भाजपसोबत गेले तर त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
सपासोबत सात जागांवर लढलं तरी किती जागा जिंकता येतील याबाबत रालोदमध्ये विश्वास नाही. त्यामुळे सात जागा सोडून भाजपसोबत पाच जाग घेत ते मार्ग बदलण्यात तयार आहेत.