Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी अध्यादेश निघणार, शिंदेंच्या खास मंत्र्याचे मोठे विधान…

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. २० जानेवारीपासून जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघतील. त्यांच्यासोबत मराठा समाजातील लाखो बांधव असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकारकडून जरांगे यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार ९० टक्के प्रश्न सुटले आहेत.
आता उर्वरित १० टक्के निर्णय होणे बाकी आहे. सगेसोयरे बाबत कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून आम्ही अध्यादेश काढू. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
मनोज पाटील जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. आरक्षण प्रश्नावर सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यांनी सुरवातीला हे आंदोलन हाती घेतले त्यावेळी मराठवाडा येथील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे हा विषय घेतला. Maratha Reservation
त्यानंतर त्या भागात शासनाने नोंदीची शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधून त्यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यासाठी सर्व जिल्ह्यात कुणबी नोंदी शोध मोहीम शासनाने सुरू केल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील येत्या १६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी उद्या २० जानेवारी रोजी ते अंतरवली सराटी येथून निघणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात हालचालींना वेग आला आहे.