शत्रूना भरणार धडकी !आता भारत-पाकिस्तान सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा…!

पुणे : आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. यामुळे ही एक अभिमानाची बाब आहे. शत्रूंशी लढणार्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून मिळावीत, महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी संस्थेने हे काम केले आहे.
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. यासाठी अनेक स्थरावर प्रयत्न केले गेले. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोर्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ हा पुतळा बसण्यात येणार आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.
तसेच या संस्थेतर्फ शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती व पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे. याचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे