Rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पुढील दोन दिवसही पाऊस पडण्याची शक्यता…


Rain : राज्यातील काही भागात नवीन वर्षात पहिला पाऊस पडला. राज्यात थंडी फारशी नाही, पण पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिवाळा सुरु असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पावसाची शक्यता आहे.

तसेच सांगली शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. Rain

सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे थेंब पडले. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!