PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरकार भाऊबीजच्या दिवशी जमा करणार ‘या’ योजनेचे पैसे, वाचा सविस्तर..

PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकार देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट देणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या काळातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी सध्या शासन स्तरावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. PM Kisan Yojana
महाराष्ट्रातील ८५ लाखाहुन अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी राज्यातील लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर, पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. २०१९ मध्ये ही योजना सर्वप्रथम सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले जात आहेत.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशांचे वितरण होत आहे. दर चार महिन्यांनी एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत १४ हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. १४ वा हफ्ता २७ जुलै २०२३ रोजी देशातील ८.५० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता चौदाव्या हप्त्यापोटी राज्यातील ८५ लाख ६० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १ हजार ८६६ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. दरम्यान या योजनेचा चौदावा हप्ता जमा होऊन आता साडेतीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे.
यामुळे या योजनेचा पुढील हप्ता केव्हा जमा होणार हा सवाल शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. दरम्यान, केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून या योजनेचा पुढील हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थातच भाऊबीजच्या दिवशी जमा केला जाणार अशी माहिती समोर आली आहे.
निश्चितच जर भाऊबीजच्या दिवशी केंद्र शासनाने या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर दिवाळीच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.