भूकंपातील मृतांची संख्या पोहचली 15 हजारांवर…!
भारताकडुन मदतीचा हाथ...!

नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमींची संख्या 80 हजारांच्या पुढे गेली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. अशा परिस्थितीत मृत आणि जखमींची संख्या अनेक पटींनी वाढू शकते.
दरम्यान, तुर्कस्तानच्या विविध शहरांमध्ये पुन्हा पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हिसेस (यूएसजीएस) च्या अहवालानुसार, रात्री 12 वाजून 14 मिनिटांनी सकाळी 7.14 च्या दरम्यान वेगवेगळ्या वेळी पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले. त्यांची तीव्रता 4.4 ते 4.5 पर्यंत होती.
दुसरीकडे, तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले आहे. या माध्यमातून भारताने तुर्कस्तानच्या लोकांना मदतीचा हात वाढवला आहे. लष्कर, हवाई दलाचे कर्मचारी, एनडीआरएफ आणि डॉक्टरांचे पथक तुर्कीला पाठवण्यात आले आहे. मदत साहित्यही मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात आले आहे.