Accident News : पुन्हा एक भीषण अपघात, एकाच कुटूंबातील सहा जणांचा मृत्यू, कारचा झाला पूर्ण चक्काचूर..

Accident News जयपूर : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात काल रात्री एक भीषण अपघात झाला झाल्याची माहिती आहे. बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident News) सहा जणांना जीव गमवावा लागला. हा भीषण अपघात रविवारी (ता.१०) रात्री उशिरा रुपावस येथे झाला आहे. (Accident News)
या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. धडकेनंतर कारचा पूर्ण चक्काचूर झाला आणि त्यामुळे आत अडकलेल्या लोकांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
हरेंद्र आणि त्यांची पत्नी ममता आणि मुलगी जान्हवी, संतोष आणि त्यांची पत्नी सुधा आणि त्यांचा मुलगा अनुज अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. मृत हरेंद्र यांची सहा वर्षीय मुलगी जान्हवी हिचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पघातग्रस्तांचे कुटुंब ढोलपूरच्या खरगपूर गावचे रहिवासी होते. सर्व मृतदेह आरबीएम जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एकादशीनिमित्त सीकरमधील रिंगा परिसरात असलेल्या ठिकाणी दर्शन घेऊन कुटुंबीय परतत होते. बस आणि कार यांच्यात धडक झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला होता.
हे कुटुंब खातू मृतदेह छिन्नविछिन्न; कारने गेले होते. तेथून परतत असताना अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची कार रुपवासजवळ येताच समोरून येणाऱ्या बसची जोरदार धडक झाली. ड्रायव्हरने डुलकी घेतल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.