राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या..


पुणे : राजकारणात सध्या मोठे कुटुंब असलेले पवार कुटुंब एकत्र येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. काल पुण्याच्या साखर संघाच्या बैठकीत खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात संयुक्त बैठक झाली. महिन्याभरात ही चौथी बैठक ठरली आहे.

आताही त्यांच्यात बैठकी झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का? या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी असे उत्तर दिले आहे.

सोमवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे येथे एक बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये साखर उद्योगाविषयी चर्चा झाली. ऊस शेती आणि साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमता सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर चर्चा झाली. या बैठकीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीविषयी विचारले असता, कामाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात असे उत्तर त्यांनी दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. राज्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे ते म्हणाले. राज्यात पाण्याची समस्या वाढली आहे. \

याविषयी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!