महाराष्ट्रातील दहावी अन् बारावीचा निकाल कधी?, महत्वाची माहिती आली समोर..

पुणे : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांसह पालकांना देखील उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील दहावी अन् बारावीचा निकालाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. आता दहावी आणि बारावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून येत्या १५ मे पर्यंत दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे.
तसेच ५ ते १० जून दरम्यान दहावीचा निकाल, तर १५ मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल.
राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच १५ मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
येथे पाहता येणार निकाल..
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org