काय सांगता! सोन्याच्या दराचा होणार कहर, वर्षाखेर सोने गाठणार २ लाख प्रतितोळा…

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून काल २१ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने प्रतितोळा लाखाचा टप्पा गाठला होता. पुन्हा २२ एप्रिल रोजी सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा १५०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९९०००चा टप्पा पार करत जीएसटीसह हेच सोन्याचे दर १०२००० रुपये इतके झाले आहेत.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे चित्र आहे. जळगावात सोमवारी सोन्याच्या भावात सकाळी ६०० व संध्याकाळी पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली होती.
यामुळे सोने ९७.३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. तर जीएसटीसह १ लाख २१९ रुपये प्रति तोळा झाले आहेत. तसेच, चांदीत १२०० रुपयांची वाढ होऊन, ती ९७,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
आगामी काळात सोन्याचा भाव असाच वाढत जाईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव हा २ लाखांची पातळी गाठेल, असे भाकित काही तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तसे घडल्यास लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे, सर्वसामान्यांना अवघड होईल.