मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 कारमध्ये डिझेलच्या जागी भरलं पाणी, धक्कादायक प्रकाराने उडाली खळबळ, पेट्रोल पंप केला सील, नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ वाहनं डिझेल भरण्यासाठी एका गावाजवळील पेट्रोल पंपवर थांबली होती. डिझेल भरुन झाल्यानंतर ही सर्व वाहनं काही अंतर बंद पडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
याबाबत तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाहनांच्या इंधन टाक्या तपासण्यात आल्या. तेव्हा त्यातून पाणी निघालं, यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर कारवाई केली असून सध्या तपास सुरू आहे.
पेट्रोल पंपवर वाहनांच्या टाक्या उघडण्यात आल्यानं गॅरेजसारखी परिस्थिती निर्माण झाली. यानंतर काही ट्रक चालकदेखील अशाच प्रकारच्या तक्रारी घेऊन पोहोचले. मुख्यमंत्री मोहन यादव यांचा ताफा ‘एमपी राईज २०२५’ या कॉन्क्लेव्हसाठी निघाला होता.
यावेळी ताफ्यातील १९ वाहनं ढोसी गावाजवळील पेट्रोप पंपावर थांबली. डिझेल भरुन झाल्यानंतर ही वाहनं निघाली. पण काही अंतर पुढे गेल्यावर १९ वाहनं एकाएकी बंद पडली. या वाहनांच्या इंधन टाकी उघडण्यात आल्या. तेव्हा त्यातून पाणी बाहेर पडलं. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत तपास सुरू असून पेट्रोल पंप देखील सील करण्यात आला आहे.
दरम्यान, याची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमचे विभागीय अधिकारी तिथे पोहोचले. नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न आणि नागरी पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. गाड्यांच्या डिझेल टाक्या उघडण्यात आल्या. याबाबत सध्या तपास सुरू आहे.