Uruli Kanchan : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, उरुळी कांचन येथील घटना…


Uruli Kanchan : अज्ञात कारणावरून एका ३७ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता.१६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

उषा संजय गायकवाड (वय.३७, रा. दाते कॉम्प्लेक्स, शिंदवणे रोड, उरूळी कांचन ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय तुकाराम गायकवाड (वय.४४) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दाते कॉम्प्लेक्स या ठिकाणी संजय गायकवाड हे त्याच्या पत्नीसह राहतात. गुरुवारी दुपारी घरी कोणी नसताना राहत्या घरात उषा यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांचे पती संजय यांच्या निदर्शनास आले. Uruli Kanchan

संजय गायकवाड यांनी तात्काळ उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उषा यांना दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उषा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे. तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!