फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला मोठा धक्का, ३५ नेत्यांचा राजीनामा, ठाकरे गटाला मोठं खिंडार..


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला.

तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ३५ स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, लवकरच महापालिका निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ३५ स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकत आणखी वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

सोमवारीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. जळगावमधील शिवसेना ठाकरे गटाचे काही नाराज माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी देखील एक बातमी समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!