Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू समाज, वक्तव्यामुळे राज्यात संताप…


Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेचा विषय बनले आहेत. सांगलीतील नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी हिंदू समाजावर जोरदार टीका केली आहे.

मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, ज्यामुळे अनेकांचा संताप व्यक्त झाला आहे. भिडे यांच्या या वक्तव्यामुळे एक नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्यांनी देशातील राजकारण आणि अर्थकारणाबद्दलही तीव्र टिप्पणी केली, ज्यात ते म्हणाले की, सत्ताकारण शूद्र आहेत, हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत.

संभाजी भिडे म्हणाले, गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवाच्या दांडियाने हिंदू समाजाला कमी लेखत आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांवरून स्पष्ट होते की, त्यांनी उत्सवांच्या स्वरूपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, भिडे यांनी शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले. Sambhaji Bhide

भिडेंच्या वादग्रस्त विधानावर आता विरोधकांनीही प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भिडेंच्या विधानाची तीव्र शब्दांत टीका केली असून, हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे स्पष्ट केले आहे.

त्यांनी राज्य सरकारवरही आरोप केला आहे की, ते गुन्हेगारांना पाठिशी घालतात. या प्रकरणामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, भिडेंच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधान करून चर्चेचा विषय बनला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!