पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर, मिळाला जामीन..

पुणे : नऊ हजार गुंतवणूकदारांची ८०० कोटींना फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले आहेत. एकीकडे गुंतवणूकदारांचे ८०० कोटी अजूनही अधांतरीच असताना डी. एस. कुलकर्णींची मात्र जामिनावर सुटका झाली आहे.
तब्बल पाच वर्षांनंतर डी. एस. कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. २०१९ मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. गुंतवणूकदारांचे ८०० कोटी अजूनही अधांतरी आहेत, येणाऱ्या काळात ते त्यांना परत मिळणार का? याचं उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही.
फेब्रुवारी २०१८ मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली होती. ज्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती, त्या कायद्यानुसार जास्तीत जास्त किती दिवस या आरोपींना न्यायालयात ठेवता येतं? हा निकष न्यायालयाने पाहिला. नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.