Pune News : नाना पेठेतील टोळीयुद्धात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहाजणांना बेड्या..

Pune News पुणे : नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. Pune News
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह साथीदारांना सहाजणांना अटक करण्यात आली. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर (वय. ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय. ३३), तुषार निलंजय वाडेकर (वय. २४), स्वराज निलंजय वाडेकर (वय. २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय. २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय. २७) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नाना पेठेत बंडू आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे, अनिकेत दुधभाते मित्र आहेत. गायकवाड याचे बंडु आंदेकर व कृष्णा आंदेकर यांच्याशी वाद आहे.
सोमनाथ गायकवाड हा सध्या येरवडा कारागृहात आहेत. आखाडे आणि दुधभाते हे सोमवारी सायंकाळी गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. त्यावेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अगोदर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटक केली होती. त्यात आता खूनाचे ३०२ कलम वाढविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत. अटक आरोपींना ७ आक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.