Pune : मोठी बातमी! दौंड साखर कारखान्यात दोन मजुरांचा गरम पाण्यात भाजून मृत्यू, घटनेने उडाली खळबळ..


Pune : आलेगाव (ता.दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यात रविवारी (ता. ३) दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आकस्मित मुत्यृची नोंद केली आहे.

गणेश सिताराम शिंदे आणि संदीप कुंडलिक गरदडे अशी या मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या आसपास हे दोघे कामगार कारखान्यात उसाचा रस तयार होते, वाफ तयार होते त्याठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होते. Pune

संदीप गरदडे हा पाणी मारण्याचे काम करीत असताना पाय घसरून खाली असलेल्या गरम पाण्यात पडला. तर आपला सहकारी मित्र पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश शिंदे याचाही त्याला वाचवताना मृत्यू झाला.

गरम पाणी भाजून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान दौंड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत करीत आहेत. दोन तरुणांचा दुदैवी मुत्यृ झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!