पाकिस्तानची जिरली! आता दारुगोळा संपला, ४ दिवसांत भारतासमोर गुडघे टेकवावे लागणार..


कराची : सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपासून दोन्ही बाजूने कारवाई केली जात आहे. यामध्ये भारताकडून जोरदार हल्ला केला जात आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. आता एका गुप्तचर अहवालातून पाकिस्तानची लष्करी तयारी फारच मर्यादित असल्याचा खुलासा झाला आहे.

पाकिस्तानकडे केवळ 4 दिवस पुरेल एवढाच दारुगोळा उरला असून, दीर्घकालीन युद्ध लढण्याची क्षमता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे पाकिस्तानकडे आता माघार घेण्याशिवाय कोणता पर्याय उरला नाही. पाकिस्तानी लष्कर (Pakistan) केवळ 96 तास म्हणजेच 4 दिवस युद्ध लढू शकण्याच्या स्थितीत आहे.

त्यांचा तोफखाना आणि क्षेपणास्त्र साठा अत्यंत कमी झाला आहे. भारताने जर पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू केलं, तर पाकिस्तानला माघार घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने अलीकडेच युक्रेन व इस्रायलला मोठ्या प्रमाणात 155 मिमी हॉवित्झर शेल आणि 122 मिमी बीएम-21 रॉकेट निर्यात केली आहे.

फेब्रुवारी ते मार्च 2023 दरम्यान केवळ युक्रेनलाच 42,000 रॉकेट्स आणि 60,000 शेल पाठवण्यात आले, यामुळे देशांतर्गत साठा रिकामा झाला आहे. पाकिस्तानकडे भारतासोबत दीर्घ युद्ध लढण्याची ना दारुगोळा क्षमता आहे ना आर्थिक साधनं. भारताच्या जोरदार आक्रमक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं आहे.

पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीची जुनाट उत्पादन पद्धती, वाढती जागतिक मागणी आणि देशातील गंभीर आर्थिक स्थिती यामुळे लष्करी पुरवठा ठप्प झाला आहे. महागाई, कर्जवाढ आणि घटता परकीय चलन साठा यामुळे लष्करी रेशनमध्ये कपात व सराव स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तान मोठ्या आर्थिक

कॉर्प्स कमांडर्स परिषदेतही ही चिंता व्यक्त करण्यात आली होती. आता तर केवळ 96 तास म्हणजेच 4 दिवस युद्ध लढू शकण्याच्या स्थितीत आहे. त्यांचा तोफखाना आणि क्षेपणास्त्र साठा अत्यंत कमी झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाकिस्तानवर अजून बिकट परिस्थिती येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!