लगीन घरावर शोककळा! लग्न तीन दिवसांवर अन् विजेच्या धक्क्याने नवरदेवाचा मृत्यू, घटनेने सगळेच हळहळले…


धाराशिव : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवमध्ये तीन दिवसांवर लग्न होतं, त्याअगोदरच विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे सगळेच हळहळले आहेत. याबाबत नेमकी माहिती समोर आली नाही.

जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचं नाव असून २२ जून रोजी भैरवनाथचा विवाह होणार होता. घरात विवाहाची तयारी सुरू असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे.

लगीनघरी सगळे पाहुणे जमायला लागले होते. मात्र अचानक ही घटना घडल्याने मोठा धक्का बसला आहे. विद्यूत खांबाच्या लाईनवरील स्विच बदलताना शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. या तरुणाला विजेचा शॉक नेमका कसा लागला याबाबत तपास सुरू आहे. मात्र केवळ लग्न तीन दिवसांवर आल्यावर ही घटना घडली आहे. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. यामुळे या कुटूंबावर दुःखाचा डोंगर पडला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!