लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय..!!

Cabinet meeting : राजकारण तोंडावर आले असून थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अशातच राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठक घेतली आहे. या मंत्रीमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
१) १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली.
२) संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करणार
३) राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी करण्यात आली.
४) तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार आहेत.
५) मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
६) आता शासकीय, निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण केले जाणार.
७) राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे.
८) संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
९) ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
१०) भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
११) विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
१२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ केली आहे.
१३) संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
१४) वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन दिले जाणार
१५) राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
१६) श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
१७) हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना