पाणी अडवलं तर 130 अणुबॉम्ब तयार ठेवलेत, पाकिस्तानकडून थेट धमकी….


पहलगाम : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने मोठे निर्णय घेत सिंधु पाणी वाटप करार, शिमला कराराला स्थगिती दिली. यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाकिस्ताननेही त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले.

असे असताना पाकिस्तानच्या मंत्र्याने चक्क भारतालाच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानचे मंत्री हनिफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानकडे असलेली घोरी, शाहीन आणि गजनवी ही क्षेपणास्त्रे आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, भारताने सिंधू जल करार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार राहावं लागेल. असेही त्यांनी सांगितले आहे. अण्वस्त्रं प्रदर्शनासाठी ठेवली नाहीत, असेही ते म्हणाले. यामुळे भारताकडून संताप व्यक्त केला आहे.

ती आम्ही देशभर लपवून ठेवली असून कोणतीही चूक झाल्यास ती तत्काळ वापरण्यात येतील. ही सगळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं भारतावरच लक्ष ठेवूनच तयार केलेली आहेत, असा इशारा त्यांनी दिला. यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत भारताने पाकिस्तानवर आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर अब्बासी यांनी भारतावर टीका केली आहे. भारताने व्यापार संबंध थांबवल्यानंतर पाकिस्तानने त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!