Harshvardhan Patil : मला एकटा पाडण्याचा प्रयत्न पण २३ तारखेला समजेल कोण कोणाबर आहे, हर्षवर्धन पाटील यांचे अजित पवारांना जोरदार उत्तर..

Harshvardhan Patil : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत आप्पासाहेब जगदाळे यांचे काही इतर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याच पक्षप्रवेशावरून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा चिमटा काढला. हर्षवर्धन पाटलांसोबत कोणीतरी राहू द्या नाहीतर लगेच प्रचार करतील असं अजित पवारांनी म्हटलं.आता अजित पवार यांच्या या टीकेला हर्षवर्धन पाटलांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची जी मनापासून काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कोण कोणाबरोबर राहिलं आणि कोण काय करणार आहे हे उद्याच्या २३ तारखेला निकाल लागल्यानंतर समजेल, असं हर्षवर्धन पाटलांनी म्हंटले आहे.
मला एकटं पाडण्याचा, कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तीस-पस्तीस वर्षाच्या राजकारणात अनेकांना मी मोठे केलं. ते आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात आहेत. पण तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून मतदार हुशार आहे. निकालातून जनता चोख उत्तर देईल असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. Harshvardhan Patil
अजित पवारांना उत्तर देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, त्यांच्या वक्तव्याची फार काही दखल घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण की इथे आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे ते आलेत म्हणजे काहीतरी बोलणारच आहेत.
त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची फार काही दखल घेण्याची गरज नाही आणि कोण-कोणाबरोबर राहील आणि कोणाचा विजय होईल हे लवकरच कळेल. घोडा आणि मैदान लांब नाही त्यामुळे इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनता आहे त्यांनी हे सर्व चाललेलं पाहिलंय आयाराम गयाराम चा जो कार्यक्रम सुरू आहे. त्याबाबत लोक विचारतात. गेल्या ३०-३५वर्षापासून मी राजकारणात आहे काही लोकांना मी पद दिली.
काही लोकांना आम्ही सन्मान दिला काही लोकांना आम्ही समाजापुढे आणलं त्यांना मोठेपणा दिला त्यांना मानसन्मान दिला त्यांना इतकं सगळं दिल्यानंतर आई निवडणुकीच्या तोंडावर ही माणसं आम्हाला सोडून जातात नाही. ते कशासाठी गेलेले आहेत कारण आता उमेदवारीचा प्रश्न संपलेला आहे उमेदवारी फायनल झालेली आहे. मग हा आयाराम गयारामचा जो कार्यक्रम आहे तो कशासाठी असा सवाल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.