राज्यातील ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन! थेट नियमित समावेशाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या….

मुंबई : आपल्या राज्यात आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून 30 हजार हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा करत आहेत. आता या 30 हजार कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे. यामुळे आता ही प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अधिपरिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी, लेखा अधिकारी तसेच कार्यक्रमाधिकारी पदांचा समावेश आहे.
या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात असून त्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. याबाबत शासनाकडे यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले होते. आता याला यश मिळताना दिसत आहे.
याबाबत काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समावेशनाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मात्र त्याला विलंब होत होता. आता मात्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
दरम्यान, शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर ठोस निर्णय होत नव्हता. आता मात्र निर्णय झाला आहे.