लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठे फेरबदल, चार राज्याचे प्रदेशाध्यक्षही बदलले..

नवी दिल्ली : सध्या भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे भाजप आपल्या संघटनेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे.
यामध्ये अनेक राज्याच्या मंत्रिमंडळाचाही समावेश आहे. भाजपने चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशच्या अध्यक्षा पुरंदेश्वरी, तेलंगणाची कमान केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, झारखंडमध्ये बाबू लाल मरांडी आणि पंजाबची कमान सुनील जाखड यांच्याकडे दिली आहे.
६ राज्यांच्या संघटनांमध्ये फेरबदलाची यादी केव्हाही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजप अनेक पक्षांशी युती केली आहे.
यामध्ये महाराष्ट्रात देखील अजित पवारांना सोबत घेतले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मडाविया, ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रल्हाद पटेल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे.
या बैठकांनंतर संघटनेपासून मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत सट्टाबाजार तापला आहे. यामुळे आगामी काळात अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत.