‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन! अजित पवार यांना सुनावले खडेबोल..!!

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान प्रचारात उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा आशयाची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे.
या भूमिकेचा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊन आपला या मूळ हिंदुत्ववादी भूमिकेचा अजेंडा स्पष्ट केला आहे. मात्र महायुतीत असलेल्या सेक्युलर पार्टीचे नेते अजित पवारांनी यांनी या भूमिका ही विचारधारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी मत स्पष्ट करीत अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत.
महायुतीत अजित पवार यांनीही योगी अदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला विरोध केला होता. तर देवेंद्र फडणवीस हे समर्थन करीत आहे. आता अजित पवार यांच्या विरोधावर मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे.
एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला.
त्यामुळे ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की ‘एक है तो सेफ है’,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.