ब्रेकींग! धाराशिवमध्ये राडा, दोन गटातील मारामारीत चौघांचा मृत्यू, वादाचे कारण वाचून बसेल धक्का…


धाराशिव : दोन गटांत झालेल्या हाणामारीत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिवमधून समोर आले आहे. येथील कळंब तालुक्यातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

येथील बावी या गावात शेताला पाणी देण्यावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद इतका वाढत गेला की दोन्ही गटात हाणामारी झाली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. यात 3 पुरुष एक महिला मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेत लहान मुलंदेखील जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की चार जणांना जीव गमवावा लागला.

या घटनेनेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या ही घटना घडली असून शेतात पाणी देण्यावरुन वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात येरमळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. जयवंत निंबा मोरे आणि त्यांची पत्नी हे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील काम करत होते.

दरम्यान, यावेळी प्रकाश बारकू खैरनार, ज्योती प्रकाश खैरनार, महेश प्रकाश खैरनार, सागर प्रकाश खैरनार आणि राणी संजय पाटील यांनी जमाव जमवून हल्ला केला. लोखंडी गज, कोयता आणि लाल मसाल्याचा वापर करून जयवंत मोरे यांच्यावर हल्ला केला. यानंतर ते पसार झाले.

याप्रकरणी पोलिसात पाच आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!