दहशतवाद्यांचं डोकं फोडा, त्यांचं रक्त मास बाहेर काढा!! संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर व्यक्त केला संताप…


पुणे : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत राज्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश होता. दोघांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार संतोष जगदाळे यांच्या घरी पोहोचले.

यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नीने हृदयद्रावक अनुभव सांगितला. “माझा नवरा डोळ्यांसमोर गेला. त्याच्या डोक्यात गोळी घातली गेली. चेहरा आम्हाला बघूही दिला गेला नाही. त्यांनी आमच्या नवऱ्याला मारलं, त्याचं डोकं फोडलं, मांस आणि रक्त बाहेर आलं, तुम्हीही तेच करा, त्या दहशतवाद्यांचं डोकं फोडा, गोळी घाला आणि आम्हाला त्यांचे मृतदेह दाखवा, असं त्यांनी म्हटल.

यावेळी शरद पवार यांना मृताच्या पत्नीने अश्रूंनी व्यक्त केलेला संताप अनुभवावा लागला. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांचे वडील गोळ्या घालून ठार मारले. मुलं रडत होती. आम्ही खाली उतरताना चिखलात पडलो. मी आता पायांवर उभीही राहू शकत नाही. आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. याबाबत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की, आमचं काश्मीरमध्ये फिरण्याचा पहिलाच दिवस होता. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास हा हल्ला झाला. घोडेवाला पर्यटकांना वाचवण्यासाठी ओरडत होता, त्यालाही मारलं. तोंडावर मास्क लावलेले दहशतवादी आमच्यावर गोळ्या झाडत होते. सगळं आमच्या समोरच घडल्याचे त्यांनी शरद पवार यांना सांगितले.

दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. सीसीएस बैठकीत भारताने यापूर्वी पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करणे देखील समाविष्ट होते. आता भारताने सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे. देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तान सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!