सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत घोषणा…

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली होती. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.
देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल. असेही यावेळी बावनकुळे म्हणाले. यामुळे आंदोलनाला हे मोठं यश मिळाले आहे. याबाबत त्यांना पाठिंबा वाढत होता.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व नंतर त्यावर तोडगा काढू, असंही बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं. या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले होते.
याबाबत बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी, असं म्हटलं आहे.
कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असं अश्वासनही यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे.
असे असताना बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ते म्हणाले आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय निर्णय होणार हे लवकरच समजेल.