सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! दरात ‘एवढ्या’ टक्क्यांची मोठी घसरण, जाणून घ्या..

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
यंदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठत तब्बल १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला होता. मात्र आता या झपाट्याने वाढलेल्या दरात तब्बल १० टक्क्यांची घसरण झाली असून, ९२,००० रुपयांपर्यंत भाव खाली आले आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
दरम्यान, केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात जेथे सोन्याचा दर ३५०० डॉलर्स प्रति औंस होता, तो आता ३१४० डॉलर्स प्रति औंसवर आला आहे. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होणे आणि जागतिक तणावांमध्ये झालेली घट.
ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांच्या मते, २०१३ प्रमाणे जर परिस्थिती उद्भवली, तर सोन्याचा दर प्रति औंस १८२० डॉलरपर्यंत घसरू शकतो, आणि त्यानुसार भारतातील दर ५५ ते ६० हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यंदा आणि पुढील वर्षी सोन्यात फारसा परतावा अपेक्षित नाही, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने हे सुरक्षित पर्याय राहील.