हवाई हल्ल्यानंतर देशात अलर्ट जारी, इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे रद्द, जाणून घ्या…


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ पर्यटकांचा जीव गेला होता. यानंतर भारताने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे भारताने जबरदस्त बदला घेतल्याचे दिसून आले.

पाकिस्तानमध्ये आत घुसून हे ऑपरेशन करण्यात आले. भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या नऊ तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर देशात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नऊच्या नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने अनेक उड्डाणे दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द केली आहेत.

सद्य परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडियाने पुढील आदेश येईपर्यंत ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदिगड आणि राजकोट येथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्लीला पाठवली जात असल्याचे विमान कंपनीने सांगितले. यामुळे दक्षता घेतली जात आहे.

या अनपेक्षित व्यत्ययामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. असेही कंपनीने म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्ताने इस्लामाबाद, लाहोर विमानतळांवर जाणारी सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

तसेच या भागातील बदलत्या हवाई परिस्थितीमुळे, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदिगड आणि धर्मशाळेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या आमच्या विमानांवर परिणाम झाला आहे. सध्या सुरू असलेल्या हवाई निर्बंधांमुळे बिकानेरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवरही परिणाम होत आहे. अलिकडची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!