Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे!! आता अजित पवारांनीच केली मागणी…


Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

अशातच आता एकनाथ शिंदे यांच्‍याकडेच मुख्‍यमंत्रीपद कायम ठेवावे, अशी चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्‍यमंत्रीपदी निवड व्‍हावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्‍ट्रवादीच्‍या नवनिर्वाचित आमदारांच्‍या बैठकीत चर्चा…

अजित पवार यांनी रविवारी (ता. २४) राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. यावेळी राज्‍यातील भावी मुख्‍यंत्रीपदी कोणाची निवड व्‍हावी, यावर चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री असावेत, अशी आग्रही मागणी स्‍वत: अजित पवारांनीच केल्‍याचे सूत्रांनी सांगितले आहे. Ajit Pawar

राज्‍यात २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, तत्‍कालीन राष्‍ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्‍थापन झाले. मात्र २०२२ मध्‍ये शिवसेनेत फूट फडली. अजित पवार यांना राज्याच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण अधिकार देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयही या फूटीला कारणीभूत होता.

कारण अजित पवारांना दिलेला अधिकारामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काही दिवसांनी राष्‍ट्रवादीतही फूट पडली. भाजपने अजित पवारांना महायुतीमध्‍ये घेतल्‍याने त्‍यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!