धक्कादायक! पतीने लग्नाच्या दोन तासांतच ‘या’ कारणासाठी दिला घटस्फोट, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का…


नवी दिल्ली : आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरुन लग्न मोडल्याचं पाहिलं असेल. अनेक विचित्र कारणांवरुन लोक लग्न मोडतात. अशातच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे ज्यामध्ये पतीने लग्नाच्या दोन तासांतच घटस्फोट दिला.

हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल मात्र ही गोष्ट खरी असून सध्या जोरदार चर्चेत आली आहे. एका वराने लग्नाच्या २ तासांनंतरच वधूला घटस्फोट दिला. एवढेच नाही तर नववधूला लग्नमंडपात सोडून ते लग्नाच्या मिरवणुकीसह घरी परतला. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील आग्राच्या ढोलीखर मधील आहे. या ठिकाणी डॉली नावाच्या तरुणीचं लग्न आसिफ नावाच्या तरुणासोबत झाले. लग्न झाल्यानंतर अवघ्या २ तासांत मुलाने घटस्फोट दिला.

घटस्फोट देण्याचं कारण म्हणजे, सासरच्या मंडळींकडून हुंड्यात कार आणि दागिन्यांची मागणी त्यानं केली होती. मात्र लग्नात जवळपास ३० लाख रुपये खर्च झाल्याचे कुटुंबीय अजून हुंडा देऊ शकत नव्हते. त्यांनी अजून हुंडा देण्यास नकार दिल्यामुळे सासरच्यांनी शिवीगाळ व दमदाटी सुरू केली.

दरम्यान, काही वेळातच आसिफ वधूला तीन वेळा तलाक देऊन तेथून निघून गेला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नातेवाईक आणि कुटुंबीयांनी वराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो समजून घ्यायला तयार नव्हता. या प्रकारामुळे वधूला तर मोठा धक्काच बसला. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!