गौतमी पाटीलच्या वादात आता सुषमा आंधरेंची उडी, थेट माधुरी दीक्षितचे नाव घेऊन…

पुणे : गौतमी पाटील हिचा आडनाव चाबुसस्कर असून तीने पाटील आडनाव लावू नये. अन्यथा गौतमीचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा नुकताच मराठा संघटनांनी दिला आहे. यामुळे वाद सुरू झाला आहे.
यामध्ये आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, माधुरी दीक्षित यांना कधीही दिक्षीत आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही.
अगदी माधूरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही. मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
यामुळे आता वाद सुरू होण्याची शक्यता आहे. एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे.
ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.