शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी…


पुणे : महाराष्ट्र सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून त्यानुसारच आता २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता ४ वी आणि ७ वी साठी होणार आहे.यंदाच्याच शैक्षणिक सत्रापासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्रतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता ४थी आणि ७ वीसाठी घेतली जात होती. मात्र २०१६-१७ पासून आरटीई कायद्यानुसार या परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता आणि ती ५ वी आणि ७ वीच्या विद्यार्थासाठी लागू करण्यात आली होती. मात्र आता पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

तथापि, या शैक्षणिक बदलांमुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्रीनी पूर्वीप्रमाणेच इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारित परीक्षा पद्धत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!