मुलाखतीत नापास झालात, नो टेन्शन तरी मिळणार आता नोकरी, UPSC ने सुरु केला नवीन उपक्रम, जाणून घ्या…

पुणे : जर तुम्ही UPSC परीक्षेत मुलाखतीपर्यंत पोहोचलात, तर आता तुमची नोकरी जवळजवळ निश्चित असून आतापर्यंत मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत येत होते. मात्र आता आता जर तुमचे नाव गुणवत्ता यादीत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.
तसेच नोकरी मिळणे जवळजवळ निश्चित झाले आहे. यासाठी, संघ लोकसेवा आयोगाने ‘प्रतिभा सेतू’ पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये, मुलाखत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा गोळा केला जाईल. यानंतर, खाजगी कंपन्या नोकरीसाठी थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधू शकतात.
‘प्रतिभा सेतू’ चे पूर्ण नाव प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन – ब्रिज फॉर हायरिंग एस्पिरंट्स आहे. पूर्वी ती पब्लिक डिस्क्लोजर स्कीम म्हणून ओळखली जात होती. ती २० ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाली. आता ती नव्याने सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. आता या पोर्टलद्वारे तरुणांना नोकरी मिळविण्यात मदत मिळेल.
प्रतिभेची कमतरता नाही..
यूपीएससीला असा विश्वास आहे की, हे उमेदवार कोणत्याही निवडलेल्या उमेदवारांपेक्षा कमी नाहीत. त्यांना फक्त त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी दुसऱ्या व्यासपीठाची आवश्यकता आहे. आता कंपन्या यूपीएससी पोर्टलवर लॉग इन करून या तरुणांचे प्रोफाइल पाहू शकतात आणि त्यांना नोकरीच्या ऑफर देऊ शकतात.
१० हजारांहून अधिक प्रोफाइल तयार
आतापर्यंत या योजनेत १०,००० हून अधिक उमेदवारांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि संपर्क तपशील त्यात नोंदवले आहेत. यामुळे कंपन्यांना चांगले उमेदवार शोधण्यात मदत होईल.
कोणत्या परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळेल?
या परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना या योजनेत संधी मिळेल.
नागरी सेवा परीक्षा
भारतीय वन सेवा परीक्षा
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (एसी) परीक्षा
अभियांत्रिकी सेवा परीक्षा
एकत्रित भू-वैज्ञानिक परीक्षा
सीडीएस परीक्षा
भारतीय आर्थिक सेवा
एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा