राज ठाकरे यांची पत्रकार परिषद संपली अन् मनसैनिकांनी सुरू केला राडा, हिंदीची पुस्तके फाडून पेटवली…


मुंबई : राज्यात हिंदी भाषेविरोधात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. याबाबत आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. आता राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत हिंदी भाषेच्या पुस्तकाची होळी करण्यात आली.

यावेळी मनसैनिकांनी हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचे पान फाडून ते जाळून चाकले. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही, असे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्धच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. यामुळे याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता शाळांकडून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवला जाणार का?, हे बघावे लागेल. बाजारपेठेत हिंदीची पुस्तकं विकलीच कशी जातात आणि शाळांमध्ये हिंदी शिकवलीच कशी जाते, हे आम्ही बघू, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच त्यांनी याबाबत मुख्यद्यापकांना पत्र लिहिले आहे.

आता शाळांमध्ये हिंदी शिकवण्याबाबत मनसे आक्रमक झाल्यास राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. हिंदी भाषेविरुद्ध आक्रमक झालेल्या मनसेविरोधात पोलिसांनी कारवाई केल्यास हे आंदोलन आणखीच भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे.

ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की. महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे ! असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!