देशावर शोककळा ! टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन ….


Mumbai: टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा व प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी ( ता.९) रात्री निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. हदय रक्तदाबाचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू उपचार सुरू असताना त्यांनी बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मायभूमीबद्दल प्रचंड आदर असलेल्या रतन टाटा यांनी आपला
संपूर्ण व्यवसाय भारत देशात अधिक विस्तार केला होता. १९६१ साली त्यांनी टाटा समुहात काम सुरू केलं .त्यानंतर त्यांनी स्वतः हा शॉप फ्लोअर वर काम सुरू करून समुहाची सुरुवात केली.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ साली जन्म होऊ ते अविवाहित होते. रतन टाटा यांनी मार्च १९९१ ते डिसेंबर २०१२ पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. रतन टाटा यांचे ३८०० कोटींचे व्यावसायिक साम्राज्य आहे. आपल्या संपत्तीतील ६५ टक्के संपत्ती रतन टाटा यांनी समाजकार्यासाठी दान केली आहे.

२००८ मध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. टाटांच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. २००८ मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक आहे.

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!